नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज या पोस्ट मध्ये मराठी उपयोजित लेखन मधील 10 वीच्या परीक्षेत विचारले जाणारे सारांश लेखन बद्दल संपूर्ण माहिती आणि उतारे आणि त्यांची उत्तरे या पोस्ट मध्ये देणार आहे.
परीक्षेत पत्र लेखनाचे किंवा हे सारांश लेखन असते.
- हेही वाचा: Patra Lekhan In Marathi
- हे पण शिका:जाहिरात लेखन
मित्रानो तुम्हाला प्रत्येक नमुन्याचे pdf देणार आहोत जनेकरून तुम्ही प्रिंट काढून तुमच्या जवळ ठेवू शकता आणि सोबतच तुम्हाला Saransh Lekhan म्हणजे काय?, सारांश लेखन कसे करावे? (how to write saransh lekhan in marathi) हे ही सांगणार आहे. अंशात्मक सार म्हणजे सारांश लेखन होय
(ads2)
Table Of Contents(toc)
सारांश लेखन (Saransh Lekhan In Marathi)
Saransh Lekhan ही कला आहे ही एक भाषिक कौशल्यातील कला आहे. लेखकांचे विचार आपल्या भाषेत संक्षेपात लिहून दाखवणे.
तात्पर्य सांगायचे झाल्यास एका वाक्यतही सांगता येईल त्या कलाकृतीचा संक्षेप करताना त्यातील अनावश्यक विस्तार टाळून तिची थोडक्यात पूर्णगुंफन केली तो संक्षेप होऊ शकेल किंवा त्या कलाकृतीतील मध्यवर्ती कल्पना फुलवून आपल्या शब्दात मांडली की तिचा अश्या व्यक्त होऊ शकेल परंतु सारांश लेखन मात्र वरील तिनीही प्रकाराने होऊ शकणार नाही.
Saransh Lekhan म्हणजे काय?
सारांश लेखन म्हणजे: मूळ अर्थाचा आपल्या शब्दात थोडक्यात कथन करणे होय.
सारांश लेखनासाठी त्या कलाकृतीतील प्रमुख कल्पना किंवा विचाराशी संबंधित आशा मुद्यांचे थोडक्यात पण स्पष्ट रीतीने केलेले सार संकलन म्हणजेच सारांश लेखन (Saransh Lekhan) होय.
(ads2)
- हेही वाचा: Batmi Lekhan In Marathi
सारांश लेखन कसे करावे? (How To Write Saransh Lekhan In Marathi)
सारांश लेखन इयत्ता दहावी च्या विद्यार्थ्यांसाठी का महत्वाचे आहे?
परीक्षेत सारांश लेखनाला 6 गुण दिले जातात जर तुम्हाला पत्र लेखन येत नसेल तर तुम्ही सारांश लेखन करू शकता कारण इयत्ता दहावीच्या परीक्षेत पत्र लेखनाचे किंवा हे सारांश लेखन असते.
सारांश लेखन करण्यासाठी तुम्हाला काहीही पाठ करायची गरज नाही कारण तुम्हाला प्रश्नपत्रिकेत उतारा दिलेला असतो तो उतारा वाचून तुम्हाला त्या उताऱ्याच्या मूळ अर्थाचा आपल्या शब्दात थोडक्यात कथन करायचे असते.
(ads2)
Also Read: Barley In Marathi
सारांश लेखन नमूना उतारा आणि उत्तरे (Saransh Lekhan Examples In Marathi With Answer)
(ads1)
सारांश लेखन नमुना उतारा: १
रागावर विजय मिळवायचा तर आधी अहंकाराचा त्याग केला पाहिजे. माणुसपणाने वागता यायला पाहिजे. मला मदत हवी असेल तर दुसऱ्यांना मदत केली पाहिजे. मी परिपूर्ण नाही तर इतर ही नाहीत. माझ्या चुका होतात तश्या त्यांच्याही होतात.माझ्या मना विरुद्ध गोष्टीशी जुळवून घेता आले पाहिजे तेवढा लवचिकपणा माझ्याकडे हवा रागही इतकी नाकारत्मक भावना आहे की ती ज्याचा राग आला आहे. त्याच्याशीच रागाच्या विचाराने सतत बांधून ठेवते.क्षमा करायला शिकलो की हे रागाचे विचार नाहीसे होतात. रागामुळे पडणारी मानसिक बंधणेच तुटून जातात. मनाचा उदारपणा ही राग येणे कमी करतो. रागाचे प्रकटीकरण जितके सौम्य पणे करता येईल तेवढे करावे. नाहीतर आपला राग जातो पण रागाच्या भरात बोललेले शब्द आणि केलेली कृती परस्पर नातेसंबंध दुबळे करू शकतात.
(ads2)
नमुना उतारा १ चे सारांश लेखन
अहंकारामुळे रंगाची निर्मिती होते त्यासाठी अहंकाराचा त्याग करत दुसऱ्याच आदर करायला शिकावे. एकमेकांचा आदर करावा या जगात कोणीही परिपूर्ण नाही याचा विचार करावा. आपण क्षमाशील असणे महत्त्वाचे आहे. क्षमाशील झाल्यावर रागावर विजय मिळवता येतो रागामुळे परस्पर नातेसंबंध हे दुरावत असतात. त्यासाठी सहकार्यांची भावना मनात ठेवली पाहिजे.
सारांश लेखन नमुना उतारा: १ Pdf Preview
Download Pdf(download)